विश्व के सर्वश्रेष्ठ महापुरुषों के अनमोल Suvichar
|| 100+ Suvichar
* सुभाषचंद्र बोस :-
1:- जातिसंस्थेचे निर्मूलन करा. जातिभेद, धर्मभेद याना काहीही अर्थ नाही.
2:- सर्व प्रकारच्या अंधश्रध्दा आणि धर्माच्या नावाखाली केला जाणारा वेडाचार नष्ट करा.
3:- प्रत्येक माणूस समाजाचे देणे असतोच असतो. स्वतःचे चांगले गुण समाजाला दिल्याने समाज सुधारणेच्या प्रवाहात सामील होतो.
* स्वामी विवेकानंद:-
1:- खरा यशस्वी पुरूष आपल्या कर्तृत्वाचा प्रचार करणार नाही.
2:- नियमित पणा ही निश्चयाची, आत्मबल व यश यांची माता आहे. नियमितता ही उत्कर्ष व उध्दार यांची प्रदात्री आहे.
3:- चेहऱ्यावर हास्य आणि हृदयात सच्चायी असेल तर तुमचे चारित्र्य खुलून दिसेल मात्र चेहरा निस्तेज असेल आणि हृदय काळवंडलेले असेल तर तुमचे व्यक्तिमत्व रूक्ष होईल.
4:- आकाशाशी नाते जोडण्याचा प्रयत्न करा म्हणजे सर्व विश्व तुमचे होईल.
5:- नीतीशून्य माणूस समर्थपणे जगू शकत नाही.
6:- दैव नावाची कोणतीही गोष्ट नाही
* गाडगे महाराज :-
1:- जगणे हे पूण्य आहे तर आत्महत्या हे पाप आहे.
2:- देवळात देव नाही. ब्रिटीशांनी भारताला पारतंत्र्यात टाकले तेव्हा राम विठोबा किंवा कोणतातरी देव धाऊन आला नाही, स्वातंत्र्य शेवटी माणसांनीच मिळविले.
3:- देवावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःवर विश्वास आधी ठेवा आणि आपले काम मनापासून करा. देव तुम्हाला आशीर्वाद देईल.
4:- गरीबांना पोटभर अन्न देण्यात खरी पुण्याई असते. भुकेपोटी कोणी गेले तर ती अत्यंत लाजिरवाणी गोष्ट ठरेल.
* महात्मा गांधी :-
1:- सत्यावर प्रेमकरा आणि सत्यानेच वागा सत्य तुमचा सांभाळ करील आणि तुम्हाला मोठंही करील. सत्याशी बेईमानी करणारा म्हणून स्वतःशी सुध्दा इमान राखू शकणार नाही.
2:- निर्भयता म्हणजे उध्दटपणा आणि आक्रमक वृत्ती नव्हे. ही तर भित्र्येपणाची लक्षणे आहेत. निर्भय मनुष्य नेहमी नम्र आणि शांत असतो.
3:- वेळेचे सदुपयोग करणारा सामान्य माणूस सुध्दा श्रेष्ठ होऊशकतो.
4:- आत्महत्या करणे हे नीच पणाचे लक्षण आहे. कोणाच्या रागाने आत्महत्या करणे हे त्याहूनही खालच्या दर्जाचे आहे.
*जवाहरलाल नेहरू:-
1:- हिंस्त्र प्राण्यांच्या अंगिसुध्दा दयेचा ओलावा कायम असतो.
*महात्मा फुले :-
1:- उद्योग आणि आळस याविषयी परिणामांचे अनुमान सर्व लोकांना कळत नाही. यास्तव ते त्यास अनुमानाने दैव म्हणतात. दैव हे एक रामायण व भागवतातील भाकड दंतकथेसारखेच कल्पिले असून ते सर्व मिथ्या आहे.
2:- एकाच मातापितरांपासून एक मुलगा मूर्ख आणि दुसरा मुलगा शहाणा असे विपरीत जन्मतात. तर यावरून मूर्खपणा आणि शहाणपणा हे पिढीजात आहेत. असे अनुमान काढता येत नाही.
3:- मानवाचे कर्तृत्व हे ईश्वरकृत नसून ते त्याच्या
दीर्घकालीन अनुभवाने, दीर्घदर्शी प्रयत्नाने आणि तीव्र
बुध्दिमत्तेने केलेल्या सुधारणुकीचे फलीत होय.
4:- जे अंधश्रध्दा निर्माण करतात किंवा टिकवून धरतात आणि तिचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करतात त्यांचा धिक्कार केला पाहिजे.
إرسال تعليق