विश्व के सर्वश्रेष्ठ महापुरुषों के अनमोल विचार | Marathi suvichar | 100+ मराठी सुविचार संग्रह

विश्व के सर्वश्रेष्ठ महापुरुषों के अनमोल Suvichar

|| 100+ Suvichar 





  * सुभाषचंद्र बोस :- 


  1:- जातिसंस्थेचे निर्मूलन करा. जातिभेद, धर्मभेद याना काहीही अर्थ नाही.



2:- सर्व प्रकारच्या अंधश्रध्दा आणि धर्माच्या नावाखाली केला जाणारा वेडाचार नष्ट करा.


 3:- प्रत्येक माणूस समाजाचे देणे असतोच असतो. स्वतःचे चांगले गुण समाजाला दिल्याने समाज सुधारणेच्या प्रवाहात सामील होतो.


* स्वामी विवेकानंद:- 




1:- 
खरा यशस्वी पुरूष आपल्या कर्तृत्वाचा प्रचार करणार 
नाही.


2:- नियमित पणा ही निश्चयाची, आत्मबल व यश यांची माता आहे. नियमितता ही उत्कर्ष व उध्दार यांची प्रदात्री आहे.


3:- चेहऱ्यावर हास्य आणि हृदयात सच्चायी असेल तर तुमचे चारित्र्य खुलून दिसेल मात्र चेहरा निस्तेज असेल आणि हृदय काळवंडलेले असेल तर तुमचे व्यक्तिमत्व रूक्ष होईल.


4:- आकाशाशी नाते जोडण्याचा प्रयत्न करा म्हणजे सर्व विश्व तुमचे होईल.


5:- नीतीशून्य माणूस समर्थपणे जगू शकत नाही.


6:-  दैव नावाची कोणतीही गोष्ट नाही


 * गाडगे महाराज :- 




 1:- जगणे हे पूण्य आहे तर आत्महत्या हे पाप आहे.


 2:-  देवळात देव नाही. ब्रिटीशांनी भारताला               पारतंत्र्यात टाकले तेव्हा राम विठोबा किंवा     कोणतातरी देव धाऊन आला नाही, स्वातंत्र्य शेवटी    माणसांनीच मिळविले.


 3:- देवावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःवर विश्वास   आधी ठेवा आणि आपले काम मनापासून करा. देव   तुम्हाला आशीर्वाद देईल.


 4:- गरीबांना पोटभर अन्न देण्यात खरी पुण्याई   असते. भुकेपोटी कोणी गेले तर ती अत्यंत   लाजिरवाणी गोष्ट ठरेल.


  * महात्मा गांधी :- 




 1:-  सत्यावर प्रेमकरा आणि सत्यानेच वागा सत्य तुमचा सांभाळ करील आणि तुम्हाला मोठंही करील. सत्याशी बेईमानी करणारा म्हणून स्वतःशी सुध्दा इमान राखू शकणार नाही.


 2:- निर्भयता म्हणजे उध्दटपणा आणि आक्रमक वृत्ती नव्हे. ही तर भित्र्येपणाची लक्षणे आहेत. निर्भय मनुष्य नेहमी नम्र आणि शांत असतो.


3:- वेळेचे सदुपयोग करणारा सामान्य माणूस सुध्दा   श्रेष्ठ होऊशकतो.


4:- आत्महत्या करणे हे नीच पणाचे लक्षण आहे. कोणाच्या रागाने आत्महत्या करणे हे त्याहूनही खालच्या दर्जाचे आहे.


*जवाहरलाल नेहरू:- 




1:-  हिंस्त्र प्राण्यांच्या अंगिसुध्दा दयेचा ओलावा कायम असतो.


  *महात्मा फुले :-



1:- उद्योग आणि आळस याविषयी परिणामांचे अनुमान सर्व लोकांना कळत नाही. यास्तव ते त्यास अनुमानाने दैव म्हणतात. दैव हे एक रामायण व भागवतातील भाकड दंतकथेसारखेच कल्पिले असून ते सर्व मिथ्या आहे.


2:- एकाच मातापितरांपासून एक मुलगा मूर्ख आणि दुसरा मुलगा शहाणा असे विपरीत जन्मतात. तर यावरून मूर्खपणा आणि शहाणपणा हे पिढीजात आहेत. असे अनुमान काढता येत नाही.


3:- मानवाचे कर्तृत्व हे ईश्वरकृत नसून ते त्याच्या

दीर्घकालीन अनुभवाने, दीर्घदर्शी प्रयत्नाने आणि तीव्र

बुध्दिमत्तेने केलेल्या सुधारणुकीचे फलीत होय.



4:- जे अंधश्रध्दा निर्माण करतात किंवा टिकवून धरतात आणि तिचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करतात त्यांचा धिक्कार केला पाहिजे.

إرسال تعليق

Post a Comment (0)

أحدث أقدم